अमळनेर / विशेष प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात आगीच्या ३ घटना घडल्या आहेत. उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सिअस पर्यन्त पोहचला आहे. वाढत्या तापमानामुळे तांबेपुरा भागातील मुस्लिम पिंजारी मंसुरी जमात कब्रस्तानला दुपारी अचानक आग लागली.
कब्रस्तानलाआग लागताच माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मुक्तार खाटीक यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना माहिती कळवून अग्निशमन दलास पाचारण केले. दल प्रमुख नितीन खैरनार यांच्या पथकाने तातडीने आग विझवली. बोरी नदी काठी कोरडी झुडपे ,गवत असल्याने आग पसरत होती. विजय पाटील यांच्या शेताला आग लागत असताना वेळीच आग आटोक्यात आणली. बाजूला असलेल्या ठाकरसिंग महाराजांच्या आश्रमालाही आग लागू शकली असती परंतु वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन दल सध्या सज्ज झालेले दिसून येत आहे.