बोदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- बोदवड तालुक्यातील कुन्हा हरदो गावातील महिला शेतकरी लीलाबाई रामचंद्र माळी ही त्यांच्या शेतात सोमवारी सकाळी कपाशी लागवड करण्यासाठी गेली असता अचानक रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात या महिलेचा गळा चिरला गेला. हात व पायासही गंभीर इजा झाली आहे. या महिलेस तातडीने जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या शिवारात अनेक वेळा वन्यप्राण्यांचे हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वाताबरण पसरले आहे.