जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात हत्या,अपघात ,अत्याचार च्या घटना वाढतच आहेत.जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी येथील २४ वर्षीय तरुणाचा वाघूर धरणातील पाटाच्या चारीमध्ये मृतदेह संध्याकाळी आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल युवराज भिल (वय २४, रा. रायपूर कंडारी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वडिलांसह राहतो. मोठ्या भावाचे लग्न झाले आहे. तो दुसरीकडे राहतो. तर बहिणीचेही लग्न झाले आहे. रविवारी रात्री गावातील काही लोकासोबत तो मद्य पीत बसला होता. त्यानंतर काही वेळाने तो बेपत्ता झाला. त्याचा शोध नातेवाईकांनी सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे गुरुवारी नातेवाईक यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद केली. त्याचवेळी गुरुवारी संध्याकाळी वाघूर धरणाजवळ काही मेंढपाळ लोकांना राहुलचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी एमआयडीसी आणि नशिराबाद दोन्ही पोलीस स्टेशनचे एपीआय घटनास्थळी पोहोचले होते. दोघेही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव या ठिकाणी हलविला. मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीच तेथे असून तो कुजलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला आहे. दरम्यान त्याला गावातील जयराम कोळी याने ठार केले असावे या संशयावरून गावकऱ्यांनी जयराम कोळी याला चोप देत पब्लिक मार दिला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सोडवले आणि जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तसेच संशयितांची देखील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा होत आहे.