जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पाळधी येथून कुसुंबा येथे घरी जात असलेल्या तरुणाला पाळधी गावाच्या पुढे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. संदीप गोरख देसले (वय ३८, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुसुंबा येथे आई, वडील, भाऊ, बहिणी, पत्नी, १ मुलगी, १ मुलगा यांच्यासह राहतो. साईरास ट्रॅव्हल्स येथे तो चालक म्हणून काम करतो. सोमवारी १९ जून रोजी सकाळी तो पाळधी येथून घरी कुसुंबा येथे जाण्यासाठी सकाळी १० वाजता निघाला होता. गाव सोडल्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आसपास त्याला अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात तो रस्त्यावर फेकला गेला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी आक्रोश केला.पाळधी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.