Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावशासन आपल्या दारी' आणि जनता गेली उपाशी .. जिल्ह्यातून आलेल्या महिला नाराज

शासन आपल्या दारी’ आणि जनता गेली उपाशी .. जिल्ह्यातून आलेल्या महिला नाराज

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यावेळी जळगाव जिल्ह्यातील महिला-पुरुषांनी कार्यक्रमात मोठी गर्दी केली होती. पण कार्यक्रमास्थळी व परिसरात मात्र पिण्याचे पाण्याचे व जेवणाचे नियोजन नसल्याने जनतेला भुकेले घरी जावे लागले.अनेकांना पिण्याच्या पाण्याची तहान लागली होती. यासाठी सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली एव्हढे मात्र खरे…!

कार्यक्रमातून निघालेल्या महिलांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.त्यातच पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. ढिसाळ नियोजन, तसेच कार्यक्रम सुरू असताना महिला मध्येच कुजबुज करत होत्या ,काहीसा गोंधळमय वातावरण कार्यक्रम स्थळी दिसून आले,महिला सूत्रसंचालक नेमकं काय बोलत होत्या हे बऱ्याच जणांना कळत नव्हते. दरम्यान व्यासपीठावरही पदाधिकारी काहीसे गोंधळ घालत होते. पोलीस प्रशासन वारंवार त्यांना सूचना करत होते. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लाभार्थ्यांसाठी असताना शेकडो महिलांनी नाराजी व्यक्त करीत कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेत संताप व्यक्त केला आणि आपापल्या गावाकडे चालत्या झाल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या