Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रहिंदी विषय शाळांमध्ये ऐच्छिक — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

हिंदी विषय शाळांमध्ये ऐच्छिक — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी — महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, राज्यातील शाळांमध्ये हिंदी विषय आता अनिवार्य राहणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की हिंदी आता ऐच्छिक विषय असेल आणि विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या रूपात कोणतीही भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल — मात्र त्या भाषेची निवड किमान २० विद्यार्थ्यांनी केली पाहिजे.

या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक स्वायत्ततेत वाढ होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार भाषा निवडण्याची मुभा मिळणार आहे. तसेच स्थानिक भाषांना देखील चालना मिळण्याची शक्यता आहे.

हा निर्णय लागू झाल्यानंतर शाळांना याबाबत आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील आणि विद्यार्थ्यांच्या भाषेच्या निवडीचे व्यवस्थापन करावे लागेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या