जलयात्रा, वेदिक विधी, भागवत कथा, कीर्तन सप्ताह व महाभंडाऱ्याचे आयोजन!
जळगाव-मन्यारखेडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- विश्वातील एकमेव मानल्या जाणाऱ्या ‘ग्रह-राशी-नक्षत्र मंदिरा’च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दिनांक 28 मार्च ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत मन्यारखेडा येथे करण्यात आले आहे. श्री बदरीनाथ मंदिर संस्थान, जळगाव तसेच समस्त मन्यारखेडा ग्रामस्थ आणि बदरीनाथ भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य धार्मिक सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याची सुरुवात 28 मार्च रोजी जलयात्रेने होणार असून गांधी उद्यान येथून कालिका माता मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर 29 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत विविध वेदिक विधींनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा पुढील प्रमाण :-
31 मार्च रोजी ब्रह्मवधूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांचा आगमन सोहळा आयोजित करण्यात आला असून, 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत श्री गुरुगीता कथा होणार आहे. 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता श्री गुरुची रुद्राक्ष व गूळ तुला हा विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प. पू. ह. भ. प. श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते मंदिराचे कलशारोहण करण्यात येणार असून, त्याच दिवशी ब्रह्मवधूत डॉ. सुमंताश्रमजी महाराज यांच्या हस्ते सर्वतीर्थ कुंडाचे लोकार्पण होईल. याच दिवशी प. पू. स. गु. मयूरदादा महाराजश्री यांचा गादीपट्टा अभिषेक सोहळा देखील पार पडणार आहे.
2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन समारंभ होणार आहे. 3 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत 108 कुंडात्मक हरीहर यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
3 ते 9 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री बदरीनाथ भागवत कथा आचार्य भुवनचंद्र उनियाल (पूर्व धर्माधिकारी, बदरीनाथ धाम, हिमालय) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तसेच या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार ह. भ. प. श्री योगीराज महाराज पैठणकर यांचेही कीर्तन होणार आहे.
8 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भगवान बदरीविशाल व भगवती महालक्ष्मी यांची सोन्याची तुला होणार आहे.
सोहळ्याची सांगता 10 एप्रिल रोजी प. पू. स. गु. मयूरदादा महाराजश्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होऊन त्यानंतर महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण कालावधीत दररोज हजारो भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून, जत्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

