Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमप्रेमात ' ब्रेक अप '....! तरुणीची हत्या ,तरुणाने रेल्वेतून उडी घेऊन संपविले...

प्रेमात ‘ ब्रेक अप ‘….! तरुणीची हत्या ,तरुणाने रेल्वेतून उडी घेऊन संपविले जीवन..! नवी मुंबईतील घटना

मुंबई/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- प्रेम आंधळे असते ,असे म्हटले जाते…प्रेमात जात ,धर्म,पंथ काही नसते..सध्या प्रेम प्रकरणाच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. यातच आणखी एक घटना सामोर आली आहे. मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका १९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. एक महिन्यापूर्वी कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. अखेर तिचा मृतदेह मिळून आल्याने कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला.

दरम्यान या घटनेने परिवार शोकाकुल झाला आहे.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आत्महत्या की घातपात ? हा प्रश्न शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सुटला. हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलीस तपास सुरू झाला. कसून चौकशी सुरू झाली.यात जे समोर आलं त्याची पुसटशीही कल्पना मृत मुलीच्या कुटुंबियांना नव्हती.प्रेमात एकतर खूप चांगलं घडतं ,नाहीतर वाईटही…! वैष्णवी बाबर असं १९ वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. वैष्णवी बाबर या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षापासून वैभव बुरगले या मुलासोबत प्रेम संबंध होते.हे प्रेम दृढ होत गेले मात्र, कुठल्या तरी कारणाने तिने हे प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला.प्रेयसीने ब्रेकअप केल्याने तरुणाचा राग अनावर झाला. यातूनच प्रेयसीला कायमचं संपवण्याचा कट त्या तरुणाने रचला. आरोपी तरुणाने एका साथीदारासोबत तरुणीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह नवीमुं बईतील तळोजा जेल परिसरात आणून टाकला. जवळपास एक महिना मृतदेह तसाच राहिल्याने कुजला होता.परिसरात दुर्गंधी पसरू लागली होती.

प्रेयसीची हत्या नंतर तरुणाची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या. !

प्रेयसीची हत्या केल्यानंतर तरुणानेही रेल्वेमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.पोलीस तपास सुरू होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्या मुलाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत आपणच मुलीला मारले आहे, “आम्ही पुढच्या जन्मी पुन्हा भेटू …” असे लिहून आपणही आत्महत्या करत असल्याचे यात नमूद केले आहे, यासाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये असे नमूद केल्याचे समोर येत आहे. मुलीचा मृतदेह तळोजा जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती. या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.
याबाबत अधिकृत अधिक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली. प्रेम प्रकरणात अशा घटना घडत असतात ,परिणाम वाईट होतो हे मात्र नक्की…!

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या