Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमसासूच्या बोलण्याचा राग आल्याने असोद्याच्या सुनेने संपविली जीवनयात्रा ....

सासूच्या बोलण्याचा राग आल्याने असोद्याच्या सुनेने संपविली जीवनयात्रा ….

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रागाच्या भरात अनेक गोष्टी घडत अशक्त,परंतू वाद इतका विकोपाला जातो की,त्यातून वाईट घटना घडल्या आहेत. अशीच दुर्दैवी घटना असोदा येथे घडली असून परिसर सुन्न झाला आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेल्या पायल संदीप चौधरी (२९, रा. आसोदा, ता. जळगाव) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना गुरुवार, १४ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता समोर आली.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘माझी प्रकृती ठीक नसल्याने आज कंपनीत कामाला जाऊ नको ‘, असे सासूने सांगितल्याने त्याचा राग येऊन पायल संदीप चौधरी हिने गळफास घेतला ,तिचा पती गावातच धान्याच्या दुकानावर कामाला आहे. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सासूची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आज कामावर जाऊ नको, असे विवाहितेला सांगितले.त्याचा राग येऊन विवाहितेने मागील खोलीत जाऊन गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार सासूच्या लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड केली.त्या वेळी शेजारील कुटुंबांनी विवाहितेला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे करीत आहेत.दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसर शोकाकुल झाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या