Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावतोरणमाळहून परतत असताना झालेल्या अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू...

तोरणमाळहून परतत असताना झालेल्या अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

अमळनेर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- सध्या अनेक जण पर्यटनासाठी निसर्ग सौंदर्य असलेल्या ठिकाणी जातानाचे चित्र दिसत आहे.जळगाव व धुळे जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.तोरणमाळ फिरायला गेले असताना परत येतांना रस्त्यावरील खड्ड्यांनी अमळनेर तालुक्यातील वावडे येथील १९ वर्षीय भावी अभियंता तरुणीला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना शहादा तालुक्यातील अनरदबारी जवळ दिनांक २९ रोजी सायंकाळी घडली. यामुळे कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वावडे येथील रवींद्र ठाकरे व कुटुंबीय तोरणमाळ फिरायला गेले होते. तेथून परत येत असताना येथून परततांना त्यांची मुलगी हर्षदा रवींद्र ठाकरे (वय १९) ही मावस भावासोबत स्कुटीवर येत होती. मात्र अनरदबारी जवळ रस्त्यावर असलेल्या खड्डयात गाडी घसरल्याने गाडीवर बसलेली हर्षदा रस्त्यावर पडली आणि मागून येत असलेल्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली डोके आल्याने ती जागीच गतप्राण झाली. ती शिरपूर येथील आर सी पाटील इंजिनियरिंग कॉलेज मध्ये द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील प्रगतशील शेतकरी आहेत.तिच्या या अपघाती निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. खड्यांमुळेच ह्या निष्पाप तरुणीचा जीव गेला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे स्थानिकांची ही ओरड आहे. अपघात प्रकरणी पोलिसांत नोंद झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या