मुख्य संपादक चंदन पाटील..
कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे..
जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या आठवड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस तर उन्हाचा तडाखा असे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात या बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाला आहे. काल सोमवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगावमध्ये सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंदवले गेले होते. मात्र उद्यापासून (२६एप्रिल) जळगावला येलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा हा अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिला आहे.
यादरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.
जळगाव परिसरात मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा ४२ अंशावर गेला होता. यामुळे सकाळी १० वाजेपासून उन्हाचा चटका लागत होता. दुपारच्या वेळेस तर कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती.अंगाची लाहीलाही होत होती,कुलर खरेदीसाठी नागरिकांनी दुकानात गर्दी केल्याचेही दृश्य दिसून आले. या कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या कडाक्याच्या उन्हात जळगावकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सोमवारी राज्यातील सर्वाधिक ३९ अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात जळगावात विचित्र वातावरण सुरू आहे. अवकाळी पावसाने मका, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान होत आहे. दिवसभर लाहीलाही करणारं ऊन अन् सायंकाळ नंतर ढगाळ वातावरण होत आहे. काही ठिकाणी तर सायंकाळी तुरळक पावसाच्या सरी बरसात आहेत. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे.आता पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असून तापमानात कमालीची वाढ होईल असा अंदाज वर्तविण्यात आलाय. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानंतर वारे बाष्प घेऊन प्रवास करीत आहेत, परिणामी ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो आहे. राज्यातील विविध भागात २४ एप्रिल ते २८ एप्रिल पर्यंत वादळी पावसासह गारपीटचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील उद्या म्हणजेच २६ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान पाऊस झाला तर जळगावकरांना उकड्यापासून दिलासा मिळू शकतो पण शेतकऱ्यांचं टेन्शन पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.