जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे कुठल्यातरी कारणावरून तरुणावर जोरदार हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तीन ते चार जणांनी चाकू, लाठ्या, काठ्यांनी हल्ला करून रक्तबंबाळ करून तेथून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री घडली. दरम्यान गंभीर जखमी तरुणाला जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंदुर्णी येथील दत्त नगरात रात्री अक्षय वसंत गुजर हा तरुण व्यायाम करून घरी परतत येत होता. पारस मंगल कार्यालयासमोर अचानक काही जणांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटात एकाने चाकू खुपसला तर हाता पायावर जखमा करून तसेच लाठ्या, काठ्यांनी तरुणाला मारहाण केली आणि ते हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, अक्षय गुजर या तरुणाला एका दुचाकीचालकाने पोलिस ठाण्यात पोहोचवले. त्यानंतर तेथून आणखी दोघांनी तत्काळ गुजर याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तेथे प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने अक्षय गुजर याला उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.