मुंबई/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. देशांत यंदा लेकींनी डंका वाजविला आहे. युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोरनं देशात पहिली रँक मिळवली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या स्थानी उमा हारिथी ही राहिली आहे. मुलींचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
उमेदवार आपला निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात. एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. इशिता किशोरने UPSC परीक्षेत 2022 मध्ये टॉप केले आहे. गरिमा लोहिया द्वितीय तर उमा हर्ती एन तृतीय क्रमांकावर आहे. स्मृती मिश्राने चौथा तर मयूर हजारिकाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी कब्जा केला आहे ,ही विशेष बाब म्हणता येईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील.UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत चालल्या. 30 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत,UPSC ने IAS, IPS सह सेवांमध्ये 1011 पदांची भरती केली होती.
दरवर्षी लाखो उमेदवार जे आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात, ते यूपीएससी नागरी सेवा परीक्षा देतात ;ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेशी सेवा (IFS), रेल्वे गट A (भारतीय रेल्वे लेखा सेवा), UPSC Civil Services भारतीय पोस्टल सेवा,भारतीय पोस्टल सेवा, UPSC नागरी सेवांद्वारे भारतीय व्यापार सेवा यासह इतर सेवा आहेत. UPSC नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा स्वरूपाची असते. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.