जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील सुप्रीम कॉलनीमधील रहिवासी तरुणाने नैराश्यातून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास जानराव कोळी (वय ३६, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सकाळी १० वाजता घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे सीएमओ रेणूका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयत कैलास कोळी यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.