जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भीम आर्मी प्रमुख तथा दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर सहारनपुर येथे जात्यान्ध लोकांनी हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा जो प्रयत्न केला गेला तो या देशातील दलित नेतृत्व संपविन्याचा प्रकार आहे. तेंव्हा त्या मारेकारी लोकांना ताबड़तोब अटक करावी अशी मागणी अनुसूचित जाती ,जमाती अन्याय निवारण समिती प्रमुख मुकुंद सपकाळे यांनी केली. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले. सपकाळे यांनी म्हटले आहे की,संबधित गुन्हेगार त्वरित अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी जयसिंग वाघ यांनी देशातील एकूण भयावह परिस्थिति मांडून दलित समाजाने एकसंघ होवून संघर्ष करावा असे सांगितले. याप्रसंगी सत्यजीत साळवे , सुरेश तायड़े , महेंद्र केदार ,मनोहर लोखंडे ,हरिश्चंद्र सोनवणे , प्रतिभा शिरसाठ ,चंदन बिऱ्हाडे , रविन्द्र तायड़े , विजय करंदीकर , वाल्मीक सपकाळेसह कार्यकर्ते हजर होते.