नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:– नशिराबाद येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट च्या दिवसाचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. या वर्षीही आज 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त त्यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळा नंबर 2 मधील काही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष श्री.मोहन माळी यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या 38 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचे पालकत्व स्वीकारले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.तुषार भाऊ रोटे, प्रहार महिला शहराध्यक्ष सौ.वर्षाताई मोहन माळी, केंद्रप्रमुख तिडके सर, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जगदीश चौधरी सर, व प्रहार पक्षाचे पदाधिकारी ई. उपस्थित होते.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
RELATED ARTICLES