जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नेपाळ मध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगांव जिल्ह्यातील नागरिकांचे 26 पार्थिव घेऊन भारतीय वायु दलाचे विमान आज सायंकाळी 7.00 वा. पर्यंत जळगाव विमानतळ येथे पोहचणार आहे.
विमानतळावर पार्थिव वाहून नेण्यासाठी उभ्या असलेल्या अँब्युलन्स आणि तैनात बंदोबस्त
नेपाळमध्ये बस दुर्घटनेत झालेल्या भाविकांचे मृतदेह घेण्यासाठी 26 अँब्युलन्स जळगाव विमानतळावर दाखल झाल्या आहेत. सायंकाळी 7;40 वाजता विमान याठिकाणी दाखल होणार आहे. विमानतळावर नातेवाईक यांची गर्दी झाली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.